Posts

राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल! खासगी कार्यालयांतून मिळणार जलद सेवा, नागरिकांना भरावा लागणार अतिरिक्त ६ हजारांचा शुल्क

Image
लेखक : राव दिपक | दिनांक : २६ ऑक्टोबर २०२५ | पुणे                                                          राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठे परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यभरात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याची घोषणा केली असून, यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी जलद, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध होणार आहेत. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी पारंपरिक सरकारी कार्यालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही.  ही कार्यालये नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा देतील. या नव्या प्रणालीमुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील विलंब, गर्दी आणि प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर कमी होतील. मात्र या सुविधांसाठी नागरिकांना अतिरिक्त ६,००० रुपयांचे सेवा शुल्क भरावे लागणार आहे. 🚀 पहिला टप्पा – सहा मोठ्या ...

लोकशाही दिन — नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा!

Image
🌿 लोकशाही दिनाचे आयोजन 🌿 ठिकाण : तहसिलदार कार्यालय, पुरंदर स्थळ : नवीन प्रशासकीय इमारत, सासवड तालुका: पुरंदर, जिल्हा: पुणे 🗓️ सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ⏰ सकाळी ११.०० वाजता 🏛️ लोकशाहीचा खरा उत्सव – नागरिकांसाठी, नागरिकांच्या सहभागातून! आपल्या दैनंदिन शासकीय कामांशी संबंधित अडचणी, शंका अथवा तक्रारी मांडण्यासाठी “लोकशाही दिन” ही एक अतिशय महत्त्वाची संधी आहे. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित प्रश्न थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे निराकरण मिळवण्यासाठी हा दिवस नागरिकांसाठी खुला आहे. 👉 “ सरकारी काम आणि एकच महिना थांब. ..” कारण लोकशाही दिन म्हणजे नागरिकांचा अधिकार — स्वतःचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची संधी! 👨‍💼 विशेष उपस्थिती पुरंदर तालुक्याचे माननीय तहसिलदार मा. विक्रम राजपूत साहेब स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील व त्यांच्या वैयक्तिक शासकीय कामांबाबत योग्य मार्गदर्शन करतील. 📄 नागरिकांसाठी आवाहन पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपल्या वैयक्तिक शासकीय कामांशी संबंधित अर्ज, तक्रारी किंवा विनंत्या घेऊन “लोकशाही दिना”त नक्...

दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक महाराष्ट्र: प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्कांचा निर्धार

  महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी आणि परिवर्तनवादी पाऊल उचलले आहे. "सर्वसमावेशक महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट" हे या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल असून , दिव्यांग व्यक्तींना सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्याचा ठोस प्रयत्न या अंतर्गत केला जाणार आहे. प्रतिष्ठा , स्वायत्तता व समान हक्क — मूलभूत मूल्यांचा पुरस्कार प्रत्येक माणसाला जन्मतःच प्रतिष्ठा , स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत , या मुल्यांवर आधारलेले हे धोरण केवळ दिव्यांग कल्याणापुरते मर्यादित नसून , ते व्यापक सामाजिक बदलाची नांदी आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूतीच्या नजरेतून न पाहता , त्यांच्या क्षमतेचा विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे , हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षण व प्रशिक्षणासाठी अभिनव उपक्रम राज्यातील शाळा सोडलेली मुले आणि उशिरा दिव्यांगत्व ओळखल्या गेलेल्या मुलांसाठी पर्यायी शैक्षणिक प्रणाली व ‘सेतू अभ्यासक्रम’ राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक प्रवाहात पुनर्प्रवेशास हातभार लावती...

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 : ‘विकसित भारत @ 2047’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक उत्सव

पु णे, दि. १३ ऑक्टोबर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येत आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, तसेच नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धकांसाठी १५ ते २९ वर्षे हा वयोगट निश्चित करण्यात आला असून, वयाची गणना १२ जानेवारी २०२६ या तारखेच्या आधारावर केली जाणार आहे. नावनोंदणीसाठी आधारकार्ड व जन्मदाखला अनिवार्य असून, शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र तसेच बक्षीस रक्कम प्रदान केली जाईल. याशिवाय प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी आपले प्रव...

Aatmanirbhar Bharat Gets a Boost as India Opens Missile and Ammunition Manufacturing to Private Sector

In a significant step towards self-reliance in defence, the Indian Ministry of Defence has opened up the development and manufacturing of missiles, artillery shells, ammunition, and other ordnance to the private sector. This move is aimed at ensuring that India does not face a shortage of firepower in the event of prolonged conflict, and aligns with the government’s broader push for Aatmanirbharta (self-reliance). Although the government has not officially announced the decision, sources have confirmed that an important amendment has been made to the Revenue Procurement Manual (RPM). This amendment removes the previous requirement for private companies to obtain a no-objection certificate (NOC) from the state-owned Munitions India Limited (MIL) before setting up ammunition production facilities. With this change, private firms will now be allowed to manufacture key defence items such as 105 mm, 130 mm, and 150 mm artillery shells; Pinaka rockets; 1,000-pound bombs; mortar shells; hand ...

महसूल हा महासागर आहे.

महसूल हा महासागर आहे.